शुक्रवारी रात्री घडलेला प्रकार... १ तरुण व २ तरुणी, आपल्याच मस्तित मग्न,म्हणे त्यांनी शर्यत लावली.ती काय होती आणि त्यांनी ती कशी पूर्ण केली,आपण आज दिवस भर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर पाहीलं.
काय? केली की नाही पोट्ट्यांनी कमाल! सरळ देशाच्या प्रधानमंत्र्यावरच शर्यत....दम आहे भारताच्या भावी पिढीत हं.....पण अशी घटना फ़क्त भारतातच होऊ शकते. जर हा प्रकार अमेरिकेत झाला असता तर हे वीर जिवंत दिसले असते का? उत्तर आपल्याला माहित आहे. पण इकडे तस जमत नाही ना. इकडे २४ तासांच्या आत त्यांना बेल. अरे काय चाललय काय?
कोण रस्त्यावरचे पोट्टे देशाच्या पंतप्रधानाच्या घराची सुरक्षा भेदून मध्ये घुसतात काय... त्यांना अडवल काय जात नाही..नंतर मिडीयाच्या दबावाखाली त्याना अटक काय होते .... आणि २४ तासांच्या आत बेल काय मिळते(मिळणार कशी नाही, त्यातल्या एकीचा बाप काँग्रेस पार्टीचा राजस्थानातला मोठा कार्यकर्ता) ... सारचं विचित्र...
त्या फ़िदीफ़िदी हासणाऱ्या मुलीला तर चाबकानं बडवाव वाटत आहे. अस हसत होती जणू झाशीच्या राणी सारखा परक्रम केलाय. इथे देशाचा P.M.च सुरक्षीत नाही तिथ आमचं काय? पण ज्या देशात संसदेवर हल्ला होतो तिथ हा प्रश्न विचारायचा तरी कुणाला? असो.तो एक वेगळाच विषय आहे.
पण देशाच्या P.M. सोबत अशी चेष्टा योग्य नाही(मग तो कसाही असो). आपणच मान नाही ठेवला तर दुसरे कशाला त्यांचा आदर करतील.म्हणून अशी चूक भविष्यात कुणी करू नये यासाठी त्या तिघांना चांगली शिक्षा व्हायला हवी. आशा करतो की प्रत्येक देशाभिमानी माझ्याशी सहमत असेल.प्रतिक्रिया स्वागतार्ह.......