पु.लं. - सुनीताबाईंचं नातं

महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन

'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर अर्थात दस्तुरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!................................

उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वॆळ त्याच्याक्डॆ बघितंल, की डोळे दुखतात थोडेसे चालयचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी आंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, कि कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफ़ास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूह्ळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. द्र्ष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वत्तीन न्याहळायचा. एखादी झकासशी टेप लावुन देऊन माई आपल्या कामात बूडून जायच्या. भाईकाकांचे ख्रपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानीशी किंचित हलत, तेव्हा खुप सुदंर वाटंत ....गेली काही वर्ष तरी हेच रुटिन आहे. ऒषधाच्या गोळ्या आणि न बाधणारा माफक आहार. पुन्हा ऒषधांच्या गोळ्या ठरलेल्या वेळी झोपंलच पाहिजे हि माईची शिस्त. कधी कधी भाईकाका गंमतीनं म्हणत, 'अर्धशिशीला माई ग्रेन' का म्हणतात, कळलं का तुला!बाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, कि भाईकाकाचं काहीही दुसय्राला करायला लागता कामा नये, असा त्यांचा ह्ट्ट असे. हा ह्ट्ट्च रोज भल्या पहाटे त्यानां उठवी. रात्रि अथंरुणाला पाठ टेकेर्यतं त्यांच्या मनात भाईकाकांच हव-नको बघणं याच्याशिवाय दूसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किति करतात!' आम्ही आहोत ना!' असं सागंणार्या आसपासच्या मंडळीसमोर भाईकाका फक्त हसायाचे. काही म्हणता काही बोलायचे नाहित. जणु आपलं सगळं फक्त माईनीच कराव, अशी त्याचीचं अपेक्षा असायची.....
'रवी मी.... दीनानाथाच्या सुरांची लड चमकून गेली आणि भाईकाका खुशालले. खुर्चिच्या हातावर बोटांनी त्यांनी हलकेच ठेका धरला. जांभळया-लाल रगांच्या एखादा फलकारा वेडिवाकडी वळणं घेत जावा, तशी नाटकाची घंटा त्यांच्या मनात घुमली. धुपाचा गंध दरवळलला. उघडलला जाण्यापुर्वि मखमली होणारी अस्व्स्थ थरथर त्यांना स्पष्टपणे जाणवली आणी त्याणी खुर्चिच्या पाठीवर हलकेच मान टेकून डोळे मिटले.

पहिल्यापासुन माई तशी भलतीच टणक किबंहुना तिचा हा कणखरपणा पाहुनच आपण तिच्याकडे ओढले गेलो. गॊरी गोरी पान, बारकुडी अंगकाठी, साधीसुधीच सुती साडी; पण त्या नेसण्यातही किती नेटनेटकेपण. या मुलीच्या अंगावर एकही दागिना नाही, हेसुध्दा कुणाच्या लक्षात आलं नाही कधी....कुठल्या तरी संस्थेच्या वर्धापनासाठी ही आपल्याला घ्यायला आली होती. टांग्यात मागं आपण आणि मधू मांडीवर तबला नि डग्गा घेऊन बसलेले. सुपात पेटी! टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाया टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक से चलाव! नाही तर मी चालवते!!'टांग्यातून उतरल्यावर हिंन त्याला पॆसे विचारले. "द्या आणा-दीड आणा," तो म्हणाला."आणा की दीड आणा?"
मधूच्या बरोबरीनं आपण कित्येक दिवस या मुलीची नक्क्ल करत असू. पुढं आशाच काही सांस्क्रतिक कार्यक्रमांमुळे वारंवार भेटी होऊ लागल्या. ती आली, की मधू ढोसकण्या द्यायच्या. आपण बोअर झाल्याचा आव आणायचो. अशा माईशी मी लग्न करणारे, हे कळल्यावर मधू हेराण झाला होता. म्हणायचा, 'अरे लेका, तू गाण्याबजावण्यातला माणूस. तुझं काय जमणार या इस्रीवालीशी?'

पण, माई ईस्रवाली नव्हतीच. कोलेजची सहल होती तेव्हा हे कळलं सींहगडावर सगळे पोचल्यावर विद्यार्थी-विद्यार्थीनी कोंडाळ करुन बसले. मी पाहुणा आघाडीचा आणी तरीही स्वस्तात पटलेला भावगीत गायक! पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळ्यव्यावर हनुअवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मेत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली. कुठली बंर?आठवलं! माधव जूलियनांची-

कोठे तरी जाऊन शीघ्र विमानी
अनात ठिकाणी...
स्वातंत्र्य जिथे, शांति जिथे,
प्रेम इमानी
तेथे चल राणी!
भाळ न इथे प्रिती धनाविण कुणाला,
ना मोल गुणाला,
लावण्य नसे जेथे जणू चिज किराणी
तेथे चल राणी!....

पेटिवर सूर धरता धरता स्पष्टपणे जाणवलं. आपण आता, या क्षणी, इथं सिहगडावर, प्रेमात पडत आहोत.... इस्रीवाली पाणी खूप खोल होतं.हिच्या व्यक्तिम्त्वातला तो करडेपणा, खरखरीतपणा, खोटाआव आहे काय? सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम? तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे? वस्तुतः ज्युलियनांची ही कविता आपल्याला अजीबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणि' ला 'पाणी'! पण माईनं ती कविता अक्षराशः उलगडून दाखवली. नुसतीच कविता नव्हे रीतिभाती पल्याडच्या तो चांद्रप्रदेशही दाखवला....

चार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिल आणि माईला अप्ल्य भावना कळवुन टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टापाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार! त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय!"
पुढं माईनं सगळाच ताबा घेतला. लग्नाचि तारीख तिनंच ठरवली. नोंदणी पध्दतिनंच करायचं, हा देखील र्नीणय तिचाच. घर मांडायची वेळ आली तेव्हा, तिनं आपल्याशी फारशी चर्चासूघ्दा केली नाही. आपण गाण्याच्या कार्यक्रमांमघ्दे, रेकार्डिंगमद्घे बूडालेलो आणी ही बाई भाड्याच्या घरं शोधतेय पागडीसाठी हुज्जत घालतेय. अर्थात, आपल्याला बहूधा हे जमलंही नसतं. पुढंही कधी काही करायची वेळ आली नाही, माईनं ती येऊ दीली नाही.

मित्रमंडळ मोठं होतं कामही खुप होती टाईम मेनेजमेंटच्या बाबतीत आपला मामला तसा यथातथाच. माईनं हे सगळं मोडून काढंल पार्ट्या-पत्यांचे अड्डे बंद झाले नाहीत, कमी मात्र झाले. आयुष्याबद्दलच्या तिच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. स्थेर्य माणसाची वाढ रोखतं, अस ती अधूनमधून ऎकवायची भरपुर काम मिळत होती पेसा हाती खेळू लागला होत; पण माईच्या अंगावर दागिना काही कधी चढला नाही. लोकप्रियतेचा उन्माद कधी तिनं चढू दिला नाही. माईनं आपले हातपाय सतत हलते ठेवले. धाव धाव धावायंच, विस्रांतीला थोड थांबायचं पून्हा पळायला सूरवात करायची माईमूळे हे सगळ सहज वाटत होत आपण धावतोय, हे तरी कूठं कळत होतं?
ऎके दीवशी तिनं सहज विचारल्यासारखं विचारल्यासारखं विचारलं, " अजून किती दिवस नाटकं करणार आहेस रे?""म्हंजे, समजलो नाही!""नाही, बरेच दिवस रमलायस म्हणून विचारते!" त्या दिवशी सघ्यांकळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सागुंन टाकलं 'पुढचा महीना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बदं!' त्या दिवसापासून ग्रीजपेण्ट गालाला लावला नाही. आयूष्यही तसं उतरणीला लागलं होतं. स्त्कार-समारभंचाही कन्टाळा येऊ लागला होता. वक्र्तुत्व कितीही चांगल असल, तरी भाषणं देणार किती?

आणि आता ही स्थिती. अशा विकलांग अव्स्थेत एखाद्या म्हतार्य़ाला वीट आला असता.असाह्य अवस्थेत खितपत राहण्यापेक्षा मेलेलं बंर असं वाटलं असतं; पण माईनं यातलं काही काही जाणवू दिलं नाही. लग्न ठरल्यापासूनच ती अशी वागत नाही का?
माई हे माझ्याच व्यक्तिमत्त्वाचं एक्स्टेन्शन आहे, असं मला वाटलं. अर्थातच तिला हे वाक्य आवडणार नाही बाण्याची आहे; पण खरं सागांयच, तर तो स्वतंत्र बाणा मझाच आहे. माझंच ते तुलनेनं धड असलेलं शरीर आहे. समोर लगबगीनं मीच चालतो आहे. त्या शरिरात स्वतंत्र आत्मा आहे आणि त्याचं नाव माई आहे, इतकंच! माई माझा स्वाभिमान आहे. आख्खं आयूष्य ती माझा 'इगो' म्हणूनच वावरली आहे.
इथं समर्पण हा शब्द समर्पक ठरणार नाही. एकमेकांचा 'इगो' होणं, येस, धिस इज दी राइट स्टेटमेण्ट!

माई मझा इगो आहे आणि तिचा मी......

"उठतोस का रे..... बरं वाटतंय ना!"
"अं?"
"अरे ती मुलं आलीत-बच्चूच्या क्लबातली. तुला 'विश' करायचं म्हणतात."
"आफकोर्स.....आफकोर्स," भाईकाका ह्ळूह्ळू सावरून बसले.
आम्ही गुपचुप त्याचांसमोर गेलो. त्याच्यां हाती टवटवीत गुलाबांचा गुलाबाचां गुच्छ दिला.
"भाईकाका, आज व्हेलेंटाइन डे आहे ना, म्हणून आलोय!"
"काय आहे....... आज?"
"व्हेलेंटाइन डे!"
"ओह.....सो नाइस आफ यू. मी तुमचा व्हेलेंटाइन काय!"
"भाईकाका, तुम्ही आख्ख्या महाराष्टाचे व्हेलटाइन!"
मिस्कील नजरेनं भाईकाका हळूह्ळू म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या. भाईकाका दिलखुलास हसले. ते पाहून माई गर्रकन वळल्या आणि सरबत करण्यासाठी आत गेल्या.

झळझळीत उन्हाचा सोनेरी पट्टा थेट आतवर आला होता....................

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_29.html