महाराष्ट्राची ४७ वर्षातील प्रगती

गेल्या ४७ वर्षात महाराष्ट्रात बदल झाले आहेत, कित्येक बाबतीत प्रगति झली आहे, तरी पण महाराष्ट्राची चाल अडखळत आहे. शिक्षण कोणते ब कसे द्यावे या बाबत अजुनही संभ्रम आहे. मध्यम मराठी की इंग्रजी हेच अजून ठरत नाही. माहिती क्षेत्रातील संधी पाहून इंग्रजी शिवाय तरणोपाय नाही असा भ्रम झाला आहे. पिण्याचे पाणीही आपण सर्व जनसंख्येला देऊ शकत नाही, वीजवापर वाढला पण पुरेशी वीज निर्माण होत नाही. निर्मित वीजेचा ४०% भाग गळतीमुळे वाया जातो. शेती फायद्यात नाही. शेतकरी आत्महत्या करतात. शहरात रोजगाराची स्थिती बरी आहे परंतु खेड्यात काम असुनही रोजगार नाही. औद्योगिकरण चांगले झाले परंतु, फक्त मोजक्या शहरांत व त्यांचे अवति भवति. विशेष आर्थिक क्षेत्रेही याच शहरांच्या जवळ. यामुळे शहराकडे लोकसंख्येचे स्थलांतर होत आहे. खेडी उजाड तर शहरे झोपडपट्टीग्रस्त. आरोग्य व सेवांचा बोजवारा. इतर प्रांतातूनही स्थलांतर मोठ्या प्रमाणात. वीजेबद्दल न बोललेले बरे. दुष्काळी भागाकडे कोणाचेच लक्ष नाही. करण्यासारखे खूप आहे.

अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा.