३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग त्याचे लाडू वळणे. ३ वाट्यांमधे साधारण १२ ते १५ लाडू होतात. वर साखरेचे व तुपाचे प्रमाण दिले असले तरीही साखरेचे प्रमाण ज्याप्रमाणात गोड आवडते त्या प्रमाणात. आणि तूपही लाडू वळतील इतपत घालणे. जी वाटी पीठाचे प्रमाण घ्यायला वापरतो तीच साखर घ्यायला वापरणे.
डाळं म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते आहे.
नाहीत.
तमिळ मैत्रिण सौ लक्ष्मी
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.