१ वाटी आंब्याचा रस, १ वाटी दूध, १ वाटी साखर, २ चमचे पीठी साखर
ताटलीला लावायला अर्धा चमचा तूप.
४५ मिनिटे
आवडीनुसार
वरील सर्व जिन्नस ( पिठी साखर सोडून) एका पसरट कढईत एकत्र करून गॅसवर मंद आचेवर शिजत ठेवावे. मिश्रण घट्ट होत आले की आच बंद करावी व त्यात पिठी साखर घालून २ मिनिटे ढवळत राहावे. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण पसरवावे व आपल्या आवडीनुसार वड्या कापाव्यात.
ह्या वड्या नारळांबा वडीपेक्षा जास्त दिवस टिकतात पण खरं तर तशी वेळच येत नाही.
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.