समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी सायं ०४ ते ०७ या वेळी 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा.
संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१.
काही शंका,
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?
मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?
इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?
भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?
सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.
विद्वानांचे एकमत शक्य आहे काय?