आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची कविता बाळ्या!
प्यायले चकण्याविना त्याला उगाचच
त्रास देते पेय ते आता उगाचच
शब्द माझे मोडले मी शांत निजता
काढला काटा कुणी, माझा उगाचच
बिल तसे ठेवून गुत्ता सोडतो मी
मित्रही म्हणतात फुकटा का उगाचच ?
पचवले नाहीस हे लक्षात येते
ढवळवे उदरास हा वारा उगाचच
आपली बाळी म्हणे, " बाळ्या, शहाण्या"!
घालतो आहेस का गाद्या उगाचच ?!
भासलो नाही कवी मी एकदाही
जे नसावे ते कसे भासा उगाचच?