बऱ्याच दिवसांच्या मौनानंतर आमच्या लेखणीने आम्हाला भयंकर गुदगुल्या केल्या; )...त्यामुळे अनावरपणे काही शब्द बाहेर पडले...!
बघा... आणि सांगा कसे आहेत ते... वाचल्यानंतर !
************************************************************
हाय कुठला मारला नजरेतुनी मंतर?
मी मला विसरलो तिजला भेटल्यानंतर ..!
मित्र होते ताव मारत पावभाजीवर...
पोचलो मी तेथ, पण ती संपल्यानंतर ...!
लावते मज मलम माझी बायको नेमे...
लाटण्याने अंग माझे दुखविल्यानंतर ...!
संतती-नियमन करायाची असे फॅशन्...
तीन किंवा चार पोरे जन्मल्यानंतर ...!
मोक्ष लाभावा त्वरे साऱ्याच शब्दांना...
बाड कवितांचे जुने ते जाळल्यानंतर ...!
का अशा लिहितोस कविता सांग चैतन्या...
मारतिल वाचक तुला त्या वाचल्यानंतर ...!