नववधू
काय ग अस? कराव कस ।
काहीच कळत नाही ।
वरण भाताशिवाय काहीच।
कस येत नाही ॥
सकाळी वरण भात।
रात्री भात वरण ।
समजून घे हे नव्हे ।
नुसते उदर भरण ॥
पोळ्या जमत नाही ।
भाजी येत नाही ।
तांदूळ, डाळ ते नुसते
कुकरमध्ये घालते ।
त्याला कोणतेही कष्ट नाही।।
एखादेवेळी तर ते ही जमत नाही ।
दिवसभर माझ्या येण्याची ती वाट पाही ॥
माझ्या जवळ मग ती येते ।
मला लाडीकपणे म्हणते ।
गडे! आज आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ ।
आग्रह होतो; माझा नाईलाज होतो ॥
हॉटेलमध्ये मात्र ती मागवते,
भाज्यांचे चार प्रकार व पोळ्यांचे तीन '
भरपेट खाते!
वरण भात मात्र कटाक्षाने मागवण्याचे टाळते ॥
वेटरला बील आणावयास सांगते ।
पाहून बील त्यानेच माझे पोट भरते ॥
घरी येऊन मग मी तिला सांगतो ।
आण ते वरण भात ''तेच मी खातो''
अनंत खोंडे.
२५ ऑगस्ट २००९