एकदा एका माणसाला ;
सहजच अगदी मी भेटलो होतो;
वणवणनाऱ्या माझ्या वाटेवर;
त्याच्या शरदाच्या हसण्याने सुखावलो होतो.
आयुष्यात दुःखाने पिचणाऱ्या माणसांच्या;
डोळ्यात तो स्वप्ने जागवत होता;
सुकलेल्या फुलांच निर्माल्य सुद्धा;
तो अलगद पाण्यात सोडीत होता.
त्याच्या सुंदर जगण्याचा तेव्हा;
क्षणभर मला हेवाच वाटला होता;
तो गातो ते सुंदर गाणं गाण्यासाठी;
मी सुद्धा माझ्या तारा जुळवल्या होत्या.
अचानक वाटलं मला का कोण जाणे;
डोकावावं याच्या सुंदर घरात;
पण माझा भ्रमनिरासच झाला;
तो तर जगत होता यातनामय नरकात.
जीच्याबरोबर आयुष्याची सुंदर स्वप्ने;
पाहिली होती त्याने पूर्णं करण्यासाठी;
तिच गेली अर्ध्या रस्त्यावर;
टाकून त्याच्या पदरी एक अपंग भेट.
आपल्या लाडक्या बायकोची आठवण म्हणून;
ति शोकांतिका तो जपत होता;
दुःखाला विसरून स्वतःच्या;
त्याचा स्वतःचा अंश तो जपत होता.
मला माझीच लाज वाटली;
अश्रूंना डोळ्यांवाटे वाट फुटली;
तरीही तो शांतच होता;
डोळे माझेच पुसत होता.
मला म्हणाला आयुष्यात जेव्हा;
दाटून येतात खूप दुःख;
तेव्हा त्यांच्याशीच तू मैत्री कर;
आणि वेदनांच्या गावात वस्ती कर.
मग जाणवेल तुला नकळत;
तुझ्या अश्रूंचेही मोती झालेत;
अन् तुझी स्वप्नील पाखरेसुद्धा;
आकाश घेऊ शकतील कवेत.
पहाडासारखं शल्यसुद्धा;
तुला राईएवढं वाटू लागेल;
दुःखच तुला कधीतरी;
"माझा लाडका" म्हणून कुरवाळू लागेल.
त्याच अस बोलणं ऐकताना;
माझा नवाच जन्म झाला होता;
आतापर्यंत भोगलेल्या प्रसववेदनांनंतर;
पुढे तर फक्त सुखाचाच हिंदोळा होता.