सध्या गेल्या १२ दिवसांपासून चालू असलेला गोंधळ बघून सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. भाजी व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट होत आहेत, विजेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. ..... आणि बरेच काही...
अश्या परिस्थितीत "मी मतं (काँग्रेस - राष्ट्रवादीला) का दिलं, असा विचार सामान्य नागरिकाच्या मनात येत असेल का ?
मी परदेशात असल्याने मत न देता येण्याची आणि दिले नसले तरी ह्या गोंधळाची चीड मला येत आहे.
अश्या घटना उदा. खात्यासाठी मारामारी व सरकार स्थापनेला उशीर होवू नये म्हणून कायदेशीर उपाय नाहीत का ? किंवा तसे उपाय करता येतील का ?