प्रथम राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा. दुसरे दिवशी उकड्वून शिजवून घ्यावा. शिजविताना पाण्यात मिठ, ओवा, जिरे टाकावे.
आता कडई मधे तेल गरम करावे. हिंग चिमुटभर टाकून कान्दा घालावा. कांदा लालसर होईसतोपर्यंत परतावा.लालसर होत आला कि लगेचच टोमॅटो टाकून परतावा टोमॅटो मऊ होइस पर्यंत . मग हळद, तिखट, जिरेपुड मिठ टाकून हलवा १ मिनिट मग राजमा घालून मस्त परता. १ वाटी गरम पाणी घालून १ वाफ येउ द्या. म्हणजे सगळ मिळून येइल. शेवटी २ चिम्टी गरम मसाला घाला. खाली वर करुन घ्या.झाली भाजि.
भात किवा पोळी बरोबर खा.
राजमा मध्ये कधिही जास्त मसाला चांगला लागत नाहि.असे माझी आई म्हणते..हि पद्ध्त सोपी जरी वाटली तरी फार चविष्ट आहे.
आवश्य करून पाहा आणि आपला अभिप्राय कळवा..:)
माझि माय ...आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.