कविता कराव्या लागत नाहीत,
त्या नकळतच होत असतात ।
मनातल्या भावनांना जसे,
शब्दांचे आधार मिळत असतात ।
जुळवायचीच म्हणून,
वाक्यांतील यमके जुळवायची नसतात ।
वरच्या ओळींची खालच्या ओळींशी,
ओढून ताणून नाती जोडायची नसतात ।
सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या,
कवीतेतून ह्या मांडायच्या असतात ।
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत,
भावना शब्दां साठी नसतात ।
हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)