बटाट्याचे साल न काढता त्याचे चार भाग करुन त्या चार भागाच्या पातळ आकाराच्या चकत्या करणे ,कांदा चिरणे.
थोड्याश्या तेलात फोडणी करुन त्यात बटाट्याच्या केलेल्या पातळ चकत्या व कांदा घालुन परतणे.
झाकण ठेवून मध्यम आचेवर ३-४ वाफा देउन परतणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालुन परत १-२ वाफेवर परतणे.
या खमंग काचऱ्या गरम आमटी भात, मऊ भात याबरोबर चांगल्या लागतात. शिवाय पोळी, डोसा, उत्तप्पा, ब्रेड याबरोबर पण छान लागतात.
अशाच प्रकारे कार्ल्याच्या व तोंडल्याच्या काचऱ्या पण करता येतात. या काचऱ्यांमध्ये दाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ घालतात.
रोहिणी
नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.