अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे.
हळूच येते दार घराचे
हळूच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे राहते जरा बाजुला.
"ऐक जरा ना...
आठवते मज ती... टकटक
"ऐक जरा ना...
आठवते मज ती... टकटक
त्या बोटांची;
शहारते अन् रंगरोगणांखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन टपटपणाऱ्या
आभाळातुन टपटपणाऱ्या
त्या थेंबांची."
"ऐक जरा ना"
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुज करते अरामखुर्ची
"आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा?"
माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पाहत होता
मिटून डोळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत् काळी;
अजून होते मजला जाणिव
होती धुमसत विद्युत् काळी;
अजून होते मजला जाणिव
निबिड वनांतिल...
मध्यरात्रिच्या वावटळीची
—झपाटल्याची"
"ऐक जरा ना"
कौलारांतुन थेंब ठिबकला
ओठावरती
"ऐक जरा ना... एक आठवण.
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
उघडी खिडकी,
कसे म्हणाला..
मीच ऐकले शब्द तयाचे...
'या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय.""
—धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वास्तूतुन, त्या पाण्यातुन
मीच ऐकले शब्द तयाचे...
'या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय.""
—धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वास्तूतुन, त्या पाण्यातुन
दिशादिशांतुन,
हात ठेवुनी कानांवरती:
ऐकु न यावे शब्द कुणाचे,
ऐकु न यावे शब्द कुणाचे,
कुणाकुणाचे :
"ऐक जरा ना"
"ऐक जरा ना"
"ऐक जरा ना"
—इंदिरा
इंदिरा संताच्या भगिनी कमला फडके, पती ना. मा. संत, चिरंजीव प्रकाश हे सारेच साहित्यिक. ना. मा. संतांशी त्याचा १९३५ मध्ये प्रेमविवाह झाला आणि १९४६ मध्ये ते वारले. प्रेम, पतिवियोगाचे तीव्र दुःख, त्यामुळे आलेले एकाकीपण हे त्यांच्या काव्याचे विषय होते.त्या विषयांची त्यांची अनुभूती इतकी सखोल व व्यापक होती की गंगाधर गाडगीळांना त्या आधुनिक मीराच वाटतात...परंपरेचा त्याग न करता त्यांनी आपल्या कवितांचे वेगळेपण व नावीन्य कायम ठेवले. त्यांनी आधुनिक भावकवितेचा धागा लोकवाङ्मयाच्या परंपरेशी जोडला. त्यांची कविता वरवर साधी वाटते; पण ती उत्कट भावना आणि चिंतन यांमुळे सखोल झाली आहे... त्यांच्या कवितेतील सूचकता आणि अर्थवाहकता प्रत्येक वाचनात वाढतच जाते. रमेश तेंडुलकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या "दवबिंदूत आभाळ धरावे त्याप्रमाणे निसर्गाच्या असीम भव्य रूपांना कधी लहान गोजिरे रूप देतात, तर कधी एखाद्या लहानशाच दृश्याला नेणिवेतून डोळ्यांत न मावणाऱ्या आकाराची अपारता प्राप्त करून देतात."
शांता ज. शेळके, प्र. ना. परांजपे, वसंत आबाजी डहाके, नीलिमा गुंडी. कविता: विसाव्या शतकाची. पुणे.उत्कर्ष प्रकाशन, २०००.
आवडलेली कविता १—आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो