मैद्यात मीठ, जिरे, मीरे पावडर घालून हाताने एक सारखा करून घ्यावा. मग त्यात थोडे थोडे तेल घालून सारखे हाताने हालवत राहावे. एक वेळ अशी येते की, मुठीत घेऊन दाबल्यावर मैद्याची कोरडीच पण वळी तयार होते. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
मग थोडे थोडे पाणी घालून मैदा घट्ट मळून घ्यावा आणि घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून अर्धा तास ठेवावा.
नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्या पातळ पुऱ्या लाटाव्यात. पुरी लाटल्या लाटल्या गरम तेलात सोडू नये. लाटल्या नंतर ती कागदावर टाकावी १५-२० मिनिटाने ती थोडी कोरडी झाली की एकदम गरम तेलात किंचित बदामी रंगावर तळून काढावी. अशाप्रकारे सगळ्या पुऱ्या तळून काढाव्यात.
तळलेल्या पुऱ्या टिशू पेपरवर टाकाव्यात.
मैद्यात तेल घालताना थोडे थोडेच घालावे. एकदम घालू नये आणि जास्तही घालू नये.
आधी सगळ्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि मग पहिल्यांदा लाटलेल्या पुरी पासून तळ्ण्यास सुरुवात करावी.
या पुऱ्या ८-८ दिवस टिकतात. प्रवासाला करून घेण्यासाठी उपयोगी पडतात. चहाबरोबर चांगल्या लागतात.
मैत्रिण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.