पांच ते सात सुक्या मिरच्या - मध्यम तिखट होण्यासाठी.
एक चहाचा चमचा जीरे, चवीनुसार मीठ व साखर.
१५ मिनिटे
दोघांना आठवडाभर पुरेल इतकी-
कैरी व कांदा साफ करून व मध्यम आकाराचे तुकडे करून कापून तयार ठेवावा.
सुक्या मिरच्या; जीरे; मीठ व साखर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावेत. वाटताना पाणी टाकू नये कोरडेच वाटून घ्यावे. कच्ची कैरी व कांदा (कापलेला) एकत्र टाकून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा. मग ओला नारळ / खोबरे टाकून फिरवून घ्यावे.
चटणी तयार... !
पाणी अजीबात टाकू नये. कैरी व कांद्याला वाटताना पाणी सुटेलच त्यावरच समाधान मानावे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.