राहिलो न अता कुणाचा दास मी
ठेवला ना बक्षिसाचा ध्यास मी!
ऐकले ते ते खरे मी मानतो
ठेवतो अफवेवरी विश्वास मी...
वेळ जो लागायचा तो लागतो.....
एकदाचा सोडला नि:श्वास मी
ढापल्या कविता कधी माझ्या कुणी?
घेत गेलो काळजीही खास मी....
जायचे होते तिला, गेलीच ती
वादळानंतर कशास उदास मी!
नेत असते ती मला सगळ्यांकडे ...
जे हवे ते बोलतो हमखास मी!
का अचंबा वाटतो मज पाहुनी?..
(खेळतो राधेसवे हा रास मी! )
ओळखू आले सख्या डीएनए
शोधला जेंव्हा तुझा इतिहास मी!
- कारकून