बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा..
असा एकांत मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा..
अशा एकांताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी..
मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी..
मनात वाजत राही आठवणीचा पावा..
वेदना सगळ्या जुन्याच परी चेहरा नवा..
नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी..
ओठावरती येते तरी का जुनीच विराणी..
असा एकांत हवा विसर जगाचा पडावा..
स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..