जेव्हा डोक्यात विचारांची
खुप गर्दी होते, तो एकांत असतो!
जेव्हा मनात भावनांचा
पसारा होतो ,तो एकांत असतो!
वेळच्या-वेळी खाउन-पिउन
जेव्हा अस्वस्थ व्हायला होतं
तो एकांत असतो!
जेव्हा कोणाच्या आठवणीत
उर भरून येतो, तो एकांत असतो!
कोणी चांदण्या मोजीत असतो
तो एकांत असतो!
कोणी चांदण्यात शोधीत असतो
तो एकांत असतो!
जयेंद्र.