खुपदा मनाशी ठरवलं!!!

" खुपदा मनाशी ठरवलं 

तुला कहीच नाही सांगायच,

कितीही ओठापर्यंत आलं

तरीही मनातच ठेवायचं;

माझं तुझ्यावर प्रेम आहे

सांगायचं धाडसच नव्हतं माझ्यात,

तरीही तुझ्याशिवाय नव्हते

कोणीही माझ्या आयुष्यात;

तुला भावना कळाल्या नाहीत

चुक तुझी नसेल,

यावरून तुला वाटते

माझं प्रेम खोटं असेल;

एवढे दुःखं मिळाले की

दुःखाला सुख म्हणावे लागले,

मिळालेल्या दुःखातून कितीदा

खोटेच हसावे लागले;

माझं प्रत्येक दु:ख

कवितेतून प्रकट होतं,

मला कल्पनाच नव्हती

कवितेला याचं किती दुःख होतं!!! "