तू माझ्या कानात गुज सांगताना;
सारं जग मी जिंकलं होतं;
तुझ्या श्वासांचा होणारा स्पर्श;
माझ्या हृदयात मी साठवला होता.
मला अजुनही आठवतो;
तो सागराचा किनारा;
तो पहिला पाउस;
आणी ती पहिली भेट.
त्या नवखेपणावर जगताना;
मला कधीच कळालं नाही;
आपल प्रेम कधी जुनं झालं;
तुझी औळख कधी जुनी झाली.
किनाऱ्यावरच्या वाळूवरचं आपल घरटं;
तुझ्या पावलांवरच्या माझ्या पाउलखुणा;
लाटेनं कधी वाहून नेल्या;
हे कळालंच नाही मला.
तू प्रारब्धाला दोष दिलास;
मला सावरण्याचा प्रयत्न केलास;
पण खरंच सांग आपण प्रेम करताना;
प्रारब्धाला विचारलं होतं का?