कधीतरी कुठेतरी मी चुकत गेलो;
हे मला कधीतरी चुकूनच कळलं;
अन या चुका दुरुस्त करण्यासाठी ;
मी आयुश्यात पुन्हा नकळत चुकत गेलो.
जीवन आता साचल्यासारखं वाटतंय;
पण प्रवाहाची मला अपेक्षाच नाही;
कारण घुसमटलेल्या माझ्या मनाला;
जगण्याची कसली आशाच नाही.
रात्री झोपतानासुद्धा माझे;
डोळे सताड उघडेच असतात;
वटवाघळासारख अंधारात ;
चुकांची कारणे शोधत राहतात.
आयुष्यातल्या दुखऱ्या जागा;
अशाच अवेळी ठसठसतात;
आवरून धरलेल्या अबोल भावनांना;
डोळ्यांवाटे बांध फुटतात.
आयुष्य कितीही नको असलं ;
तरी ते जगावंच लागत;
संपवता येत नाही म्हणून;
नव्याने सुरू करावंच लागतं.