देव माणूस....

रहायला पेठेत आहे आणि शाखेच काम करतो गेली अनेक वर्ष.  संघकामच महत्व मनापासून पटलं आहे आणि त्याची आजची गरजाही.. पण संघाची रोजची १ तासाची शाखा चालवणे म्हणजे काही सोपे काम नव्हे अगदी नाकेनव येते. काही वेळा तर वाटत, "चायला कशाला उगाच नसती कटकट.." पण थोडा अजून विचार केला आणि रस्त्यांनी डोळे उघडे ठेऊन चाललो कि आपोआप उत्तर मिळत जातात..  हे काम करताना अनेक अनुभव आले काही चांगले आणि नाईलाजाने काही वाईटही..... अनेक माणसे संपर्कात आली आणि हृदयाला स्पर्श करून गेली.. पण त्यातला १ माणूस प्रकर्षाने आठवतो त्याच्या बद्दल सांगायचा प्रयत्न करतो.......................................
मला आठवत नाही मी पहिल्यांदा ह्या माणसाच दर्शन कधी घेतलं. नाव ‘श्रीधर फडके.’ (अनेकांना नाव पण माहित नसाव ‘पंत’ ह्या नावाने प्रसिद्ध.) साधारण ७ दशके पाहिलेला हा देवमाणूस. स्वतःच वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेऊन पूर्ण वेळ संघच काम करत आहेत. महाविद्यालयीन तरुणांच्यात रमणारा, त्यांच्यात मिसळून गप्पागोष्टी करणारा, १ द्या नवीन विषयची वा अभ्यासक्रम निगडीत विषयावर माहिती गोळा करून सांगणे आणि त्यातून त्या तरुणाला ते आपलासा कधी करून टाकतात हे कळतही नाही. 
मी लहान असल्या पासून ते आत्ता आत्तापर्यंत ते  अनेक वेळा घरी येऊन गेले असतील. मोतीबाग ते आमच घर साधरण अंतर ३-४ किलोमीटर असाव, आणि हे चालत येऊन मला भेटणारा सत्तरीतला हा माणूस मला १ प्रकारची स्फूर्ती आणि संघ कामाची प्रेरणा देऊन जातो. माझ्या बरोबरच घरच्यांशीहि हि इतके घनिष्ट संबंध जोडले आहेत जणू काही आमचे जवळचे नातेवाईकच असावेत. आजोबाच म्हणा ना. आणि असाच हा अनुभव अनेक लोकांनाही असावा ज्यांच्या घरी पंत जाऊन आले आहेत. भेटले कि पहिल्यांदा घरच्यांची आणि नंतर थेट शाखेची चौकशी. तसेच वेळ असल्यास आवर्जून शाखेतील काही लोकांना भेटायला जाऊया असा आग्रह करणार. आणि मग घेऊन जाऊ तिथे न थकता कोणत्याहि  वस्तीत किंवा किती माजले चढावे लागतील ह्याची पर्वा न करता त्या तरुणाला भेटणार.  
संघातल्या तरुणांशी अशी घट्ट मैत्री असणाऱ्या आणि त्यांना संघ कामात सतत मार्गदर्शन करणारे पंत डोळ्यासमोर आले कि त्यांची ती ह्या वयातही चाललेली संघकामाची खटपट पाहून कधीकधी न रहावत डोळ्यात अश्रू येउन जातात.....     
अशीही काही माणस आज आहेत हे बघून आश्चर्य होते. आजकालच्या मॉडन जगात जिथे फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणारी माणस आहेत तिथे हा निःस्वार्थी माणूस कस काय न थकता काम करतो हे कोडच आहे.... संघाच काम करणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांना अनेक वेळा प्रश्न पडतो कि हे कशाला? कोणासाठी आणि मीच का करावं? लोकांच्या प्रतिक्रिया बघून वैताग येतो, लोकांनाच जर पडल नाहीये तर का.... पण असा प्रश्न मनात आला रे आला कि माझ अस मत आहे कि त्यांनी ह्या माणसाच स्मरण कराव.... जर एक सत्तर वर्षाचा माणूस एवढ्या जिद्दीने करू शकतो तर आपल्याला काय अवघड आहे....