कालिंदीच्या तीरावर कुणीतरी गोप
आपली बांसरी विसरून गेला
ती पाहून, ती दचकली
तिला तिच्या आयुष्याची
दशा उमगली.....!
--------------------------------
डंवरलेल्या जांभळी खाली
टपोऱ्या जांभळांचा
सडा पडलेला
अरे ! या गावात
मुलं नाहीत की काय ?
----------------------------------
थांब, परत फिरी, रे वनविहारी
पडली नाही कां तव नजरी
करवंदीच्या जाळी बाहेरी
शेला, कंचुकी आणि बांसरी
---------------------------------
या छोट्याशा कविता माझ्या नाहीत. फार वर्षांपूर्वी वाचनात आलेल्या! हा काव्यप्रकार कोणता आहे हेही मला माहिती नाही. मात्र, मनाला चटका लावणाऱ्या या कविता जे कांही सांगतात ते 'शब्दांच्या पलिकडले...'
म्हणून, काव्यप्रेमी मनोगतींसाठी दिले आहे. तुमची दाद, असं आणखी कांही देण्याचा उत्साह देईल ही आशा.
एक गानवेडा