पाऊस आणि मुंबई

मी २६ जुलै २००५ आणि २७ जुलै २००७ या दोन्ही वेळेस पावसात अडकलो आहे. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर चार दिवसानंतर लोक कामाला जायला निघतात. इकडे ट्रेन सुरळीत चालू होत नाही तरी प्रचंड गर्दीत ही, १-१ तास ट्रेन उशिरा ने ही धावत असतील तरी हि लोक लटकत लोंबकळत आपल्या ऑफिस पर्यंत गेली होती. मी विचार करतो कशासाठी हे सगळं. मी २६ जुलैला कुलाबा ते विक्रोळी पायी प्रवास केला आहे या प्रवासात लोक किती थकली होती हे दिसत होते तरीही चार पाच दिवसा नंतर पुन्हा कामाला. कालच्या पावसात भांडूप ते मुलुंड पायी प्रवास केला सगळी कडे पाणीच पाणी झाले होते आज सकाळी हि पाऊस पडतच होता अश्या परिस्थितीत हि आज भरपूर लोक कामाला जाताना दिसले.

बंद झालेल्या ट्रेन कुठे सुरळीत रुळावर चालू होत नाही तरी हि काही लोक कामावर जाण्यास उत्सुक. या वेळी काही वाटत नाही पण २६ जुलैच्या पावसानंतर काही जणांनी ट्रेनमध्ये चढायला देत नाही म्हणून ट्रेन काय थांबवलेली आणि लोकांच्या पायावर काठ्या काय मारल्या होत्या.अश्या परिस्थिती नंतर हि लोकांना कामावर जायचं आहे याला काय म्हणायचं मुंबईच स्पिरिट ? की लोकांनी पोटासाठी त्यांनी केलेली धडपड ? काही दिवस सगळं सुरळीत होई पर्यंत शांत घरी बसले तर काय बिघडेल. एका संकटातून बाहेर यायचं आणि दुसऱ्या संकटात स्वतःला झोकून द्यायचं या मागे लोकांची मानसिकता काय असेल.