संध्या-छाया (६०+)
आता झाली आयुष्याची, रम्यशी सायंकाळ,
निसटलेले क्षण जगण्यासी निवांत असा हा काळ .
आठवणींच्या शिंपल्यामधले, मोती आता वेचावे,
ताण-तणावा दूर सारुनी छंदही जोपासावे.
वाचन-चिंतन अध्यात्म्याची थोडी भरावी गोडी,
धकाधकीच्या दिनक्रमांतूनी सवड काढावी थोडी.
शरीर संपदा आहे जोवरी,पर्यटनाला निघा तोवरी,
निसर्गाच्या कुशीत शिरुनी ,शिळ्या मनाला आणा उभारी.
मोहपाश अन मायाजाली, फार आता न गुंतावे,
उरल्या आयुचे अमूल्यक्षण जरा,स्वत;साठी वेचावे,
जरा स्वत;साठी वेचावे.
अलकाताई.