(निरोप)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची कविता निरोप . त्यांची कविता संपते त्याच्या काही वर्षांनंतरचा काळ या 'कविते'त सापडेल.

थांबा थोडे, दीर तिथे पेंगुळला नाही
जावेचाही तिरपा डोळा मिटला नाही...
कुठे संपले भांडण श्वशुरांचे सासूशी?
रंग वन्सने तोंडाचा उतरवला नाही...
चाळकऱ्यांनी कुठे लावली दारे घरची ?
आडोशाचा अजून पडदा सरला नाही...
धीर धरा हो, जरा आवरा तुमची वळवळ
चिंगी जागी आणिक बंड्या निजला नाही...
अजून काही आले नाही नळास पाणी
तशीच पडलित भांडी,ओटा धुतला नाही...
किती बोलता उच्चरवाने भलत्या गोष्टी
अर्थ नकाराचा लटक्या का कळला नाही ?