सायंकाळी समुद्रकाठी फिरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनाऱ्यावर काहीतरी उचलून समुद्रात फेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफडणारे तारामासे एक- एक करून पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकत होता. न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,; समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फरक पडणार आहे? त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फरक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फरक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.
मी एकट्याने, मराठी माणसाकडून खरेदी केल्याने किती मराठी शेतकऱ्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मॉल्स मधून खरेदी न केल्याने किती मराठी व्यापाऱ्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?
मी एकट्याने, डान्स बार मध्ये पैसे न ऊडविल्याने, किती मराठी माणसे श्रीमंत होणार?
मी एकट्याने, मराठी माणसा कडून फ्लॅट / जमीन विकत घेतल्याने किती मराठी बिल्डर / काँट्रॅक्टरांची भरभराट होइल?
मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या घरांमध्ये प्रकाश पडेल?
मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या जिवांना पाणी मिळेल?
मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडून, किराणा खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या] स्पर्धेत टिकून राहतील?
मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॉटेल मधून खरेदी केल्याने, किती मराठी हॉटेल मालकांना याचा फायदा होणार?
मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?
उत्तरे हवी आहेत, तर मग कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी.........
बाहेरच्यांना, दरमहा किमान रु. दोनशे अब्ज = २००, ०००, ०००, ०००/-
दररोज किमान रु. सहा अब्ज, सहासष्ट कोटी, सहासष्ट लाख, सहासष्ट हजार, सहाशे, सहासष्ट = ६, ६६६, ६६६, ६६६. ६६/-
त्यांना अहोरात्र, दर ताशी, रु. सत्तविस कोटी, सत्त्याहत्तर लाख, सत्त्याहत्तर हजार, सातशे, सत्त्याहत्तर = २७७, ७७७, ७७७. ७७/-
आपला पोशिंदा कसा जगेल? त्याच्या पदरात आपले किती पडतात??
उत्पादन आणि सेवा कोणालाही विकावे, प्रत्येक खरेदी, फक्त आणि फक्त मराठी शेतकऱ्याकडुनच/ व्यापाऱ्याकडुनच करावी !!
महाऱाष्ट्रात, बाहेरचे कोट्याधिष , अब्जाधिष आहेत याची लाज वाटू द्यावी !!!!
कितिही अडचणी / प्रलोभने असली तरीही, मराठी माणसालाच मोठे करावे !!!!!!
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे ।
परंतु तेथे अधिष्ठाण, देवाचे पाहिजे । ।