उधारी

नको आणखी त्या सुखाची उधारी
कधीचीच सरली मनाची उभारी

मला फसविले माणसांनीच साऱ्या
न देवात होती कुणा ती हुशारी

चिरंजीव होणे मला भाग आहे
न मारेकरी कोण घेई सुपारी

जगाने पुन्हा गाळले नांव माझे
म्हणे संपली काल खानेसुमारी

तिची नाव टाळून गेली किनारा
उभी रात्र होतो उभा मी किनारी

-------- जयन्ता५२