कव्यगती
संजीवन संवेदनशिल
मनाला बोचणारा सल
लेखणीवाटे कागदावर
पाझरणं
म्हणजे काव्य
वत्सल्य, प्रेम, मायेचा
मनात उधाणनारा रत्नाकर
शब्दसरिता होउन वाहनं
म्हणजे काव्य
एखाद्या घटनेच्या ठिणगीने
मनात भडका उडून
खेद, विरह, संतापाचं
शब्दरुपी उत्सर्जन होणं
म्हणजे काव्य
निसर्गलिलांच्या आविष्कारनं
मनातल्या शब्दसृष्टीचं सर्जन
कागदावर जीवंत होणं
म्हणजे काव्य
मंतरलेल्या शब्दांनी
रसिकाल भुरळ पाडून
त्याचं भाव मोहिनीत
गुंगून जाणं
म्हणजे काव्य......!!!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नशिक.