भारत माझा देश आहे।
सर्व भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
आपण लहानपणी शाळेत असताना हि प्रतिज्ञा रोज म्हणत असू ..
आमच्या शाळेत तर मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत अशा ४ भाषा मधून प्रतिज्ञा म्हटली जात असे ..
त्यामुळे शालेतील सर्वाना ४ भाषांमध्ये प्रतिज्ञा पाठ आहे ....
पण... आज कोण प्रतिज्ञा पाळते का ? कि संविधानातील आदर्शांप्रमाणे विसरून जायचा विषय झालाय प्रतिज्ञा म्हणजे ....असेच वाटते ...
आता पहा प्रतिज्ञेतील ४थे वाक्य
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
म्हणजे काय ?
परंपरा कशास म्हणाव्यात ...
प्रतिज्ञा म्हणताना आपणास त्याचा अर्थही समजावून सांगीताला पाहिजे...
अशातच काही बातम्या येत आहेत २४ कोस परिक्रमेवर बंदी... हैद्राबाद मध्ये भाग्यलक्ष्मी मंदिरात आरती करण्यावर बंदी ... आता ह्या परंपरा नव्हेत काय ? कि हे सगळे कायदा सुरक्षेचे प्रश्न आहेत ...
आणखीन एक बातमी ... लोकसत्ता मध्ये वाचली दाभोळकारांचा मारुती ...
ह्यांनी पोतराजांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केले .... पोताराजांचे सद्य आयुष्य भले बिकट असेल पण ती एक परंपरा नव्हे काय .. ती टिकवण्यासाठी आपण काय करतो ?
जाता जाता मला पोतराज हे मराठी सान्ताक्लोज वाटतात ? तो मान दिला तर परंपरा पण टिकेल आणि त्यांचे जीवन पण सुसह्य होईल...
काय म्हणता बरोबर का ?
कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?