कोणतेही एक कडधान्य १ वाटी (किंवा २-३ कडधान्य मिळून १ वाटी) रात्री पाण्यात भिजत घालणे. सकाळी पाणी निथळण्यासाठी चाळणीमधे ओतणे. त्यावर झाकण ठेवणे.
सकाळी किंवा रात्री कळण करायचे असेल तर आधी कूकर मधे एका पातेल्यात हे कडधान्य शिजवून घेणे. शिजवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त पाणी घालणे. शिजवल्यावर हे जास्तीचे पाणी एका पातेल्यात घेणे. समजा हे पाणी २ वाट्या असेल तर आंबट ताक अर्धी वाटी घालणे. ताकाचे प्रमाण जास्त नको, नाहीतर कडधान्याच्या पाण्याचा स्वाद लागणार नाही.
नंतर वरुन फोडणी घालणे. (फोडणीमधे हळद कमी प्रमाण) नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, १ मिरची (२-३ तुकडे करुन), मीठ व साखर घालून एक उकळी आणणे. थोडी कोथिंबीर चिरून घालणे.
हे कळण नुसते प्यायचे असते, ज्याप्रमाणे टोमॅटो सूप किंवा सार पितो त्याप्रमाणे. गरम/गार कसेही चांगले लागते.
रोहिणी
नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.