आमीर आणि नर्मदा

प्रसिद्ध अभिनेता आमीर खानने, नर्मदा आंदोलकांना पाठींबा दर्शवणारे मत व्यक्त केल्यानंतर , त्याने माफी मागावी असा तगादा लावणाऱ्या भा. ज. प. समर्थकांनी बालीशपणाचा कळस गाठला आहे, असे माझे मत आहे.
त्याच्या चित्रपटावर बंदी घालणे म्हणजे, 'असं करतोस काय! थांब तुला दाखवतोच या पद्धतीची सरळ सरळ दडपशाही झाली.
आमीर हा काही गुन्हेगार नाही. भारत हा एक स्वतंत्र देश असून, लोकशाहीने प्रत्येक नागरीकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे, याचा भा. ज. प. ला विसर पडलेला दिसतो.
बॉलीवुडने आमीरला दिलेला एकमुखी पाठींबा या पार्श्वभूमीवर स्वागतार्हच म्हणायला हवा.


" आमीरचा चित्रपट(फना) प्रदर्शित न केल्यास गुजरातवर बॉलीवूडच बहीष्कार टाकणार"
"गुजरातमधे चित्रपट प्रदर्शित न झाल्याने नुकसानभरपाई म्हणून आमीरने चित्रपट निर्माता आदीत्य चोप्राला मानधनातील दोन कोटी रुपये परत देण्याची तयारी दर्शवली" या ही बातम्या वाचनात आल्या आहेत.
मनोगतींचे या विषयावरचे मत वाचायला आवडेल.