मुंबईच्या स्फोटामध्ये मृत व्यक्तीचा मुलगा असे खोटे सांगून ठाण्याच्या एका तरुणाने श्री. शहा या गृहस्थाचे शव ताब्यात घेतले आणि त्याचे ओशिवरा दहन्भूमीमध्ये दहन करून मोकळा झाला. त्या स्फोटात मृत व्यक्तींना रेल्वेतर्फे मिळणारे ५ लाख आणि राज्य सरकारकडून १ लाख अपहरण करण्याचा त्याचा निंद्य बेत होता. शहा यांचे खरे नातेवाईक चौकशी करू लागले तेव्हा ही गोष्ट दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. त्यांना बिचाऱ्यांना शहांचे अंतीम दर्शन सुद्धा घेता आले नाही.
अतिशय चीड आणि घृणा आणणारे हे कृत्य करणाऱ्या अशा नराधमास काय म्हणावे आणि काय करावे?
काल हिंदुस्तान टाईम्समध्ये ही बातमी वाचली आणि हतबुद्ध झालो.
व्यथित,
सुभाष