औरंगजेब

पृथ्वीवर जन्नत आणन्यासाठी;

स्त्रीयांच्या गणिका करनारा तू;

हीरवा झेंडा हींदूस्थानात फडकवताना;

कदाचित जिंकलाही असतास तू.

पण त्या शहाजीचा वाघाचा छावा;

उभा राहीला सह्याद्रीच्या शिखरावर;

दोन्ही हातांनी घट्ट पकडल त्यानं;

तुझ्या विजयानं नासलेलं वारं.

तुला मिळालेलं अफाट ताकदीच वरदान;

संपत्तीचा चढलेला माज;

पण तुझ्यावरची शापांची लाखोली;

जीचं काहीच नव्हतं मोजमाप.

स्वतःला बापाला तुरुंगात टाकून;

तुरुंगाच्या फटीतून ताज दाखवलास;

हृदयातल्या यातना कवटाळून झूरताना;

त्याचा शापच तू आयूष्यभर भोगलास.

म्हणूनच बारा मावळ्यांच राज्य;

ज्याने तुझ्या अहंकाराची केली शकलं;

त्या मावळ्यांनी शिवबाच्या शब्दाखातर;

मराठी असल्याचं स्वत्व जपलं.

तू प्रयत्न केला स्वराज्य गिळण्याचा;

जरी नव्हता तुझा घास तेवढा;

पण त्या छोट्याशा शिवबानं;

अवघा सह्याद्रीच संधून ठेवला.

आजही जेव्हा दिसतो नराधम;

सत्तेसाठी धावताना, हपापताना;

तुझी आठवण हमखास येते;

अन् 'शिवबा पुन्हा जन्माला ये'

म्हणून महाराष्ट्राची माती आजही आक्रंदते.