विडंबन - केव्हा तरी पहाटे

नुकत्याच झालेल्या बहुचर्चित अभिषेक-ऐश्वर्या विवाहामुळे अनेकांच्या मनात अनेक भाव दाटुन गेले. असेच काही भाव टिपण्याचा हा एक प्रयत्न . मुळ कविता या दुव्यावर बघायला मिळेल 

जेव्हा घरी जयाच्या ....

(विवेक आणि सलमान) :

जेव्हा घरी  जयाच्या , सजवुन कार गेली

सुजले रडुन डोळे, पलटून नार गेली  ॥१॥

(सलमान :)

मारू आता कुणाला, सय दाटते कुणाची

हसवुन मिडियाला, फसवुन नार गेली ॥२॥

(सलमान विवेकला:)

जळलो तुझ्यावरी मी, उरल्या खुणा मनाशी

जळलो तुझ्यावरी मी, जळवुन नार गेली ॥३॥

(विवेक:)

फिरले क्षणात माझे, ग्रह एक त्या नभाचे

इमले स्वकल्पनाचे, उधळुन नार गेली ॥४॥

(राणी - अभिषेकशी लग्न करण्याची इच्छा अपुर्णच राहिली) :

उरली मनात आता, नशिबा कटू कहाणी

युवराज हा जयाचा, गटवुन नार गेली ॥५॥

--- सुभाष डिके (कुल)