गेली ५० वर्षे मुंबई एक बाजारपेठ: नवीन पैलू

गेली ५० वर्षे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
इंग्रजांनी मुंबईला प्रकाशझोतात आणि राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिले.
पुढे कालांतराने मुंबईने आपला विकास असंख्य उद्योगाद्वारे करून घेतला. पण यातील एक महत्त्वपूर्ण मेख आपण समजूनच घेत नाही ति अशी की

१) भारतात कुठलेही उत्पादन हे मुंबई मध्येच सर्वप्रथम बाजारात आणले जाते.
२) मुंबई ची भोळी जनताच आधी त्याची बकरा बनते. त्यानंतरच ते इतरत्र दुसऱ्या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. ते सुद्धा मुंबई बाजारपेठे मधील आलेल्या अनुभवा पासून ते आवश्यकता असल्या सुधारणा करून सर्व भारतामध्ये मार्केट केले जाते.
३) इतके असूनही प्रत्येक कंपनीच्या विक्री ची सखोल विश्लेषण केल्यास असे समजून येते की मुंबई बाजारपेठेतली विक्री ही 
संपूर्ण भारता मधील विक्रीच्या तुलनेत लक्षणीय आहे.
४) याचाच अर्थ असा की भारतामध्ये सर्वात भोळी भाबडी जनता मुंबई मध्येच राहते. कारण ती त्यांना काय काय नाही पुरवित?
आपल्या राहत्या भागात एखादे नवीन हॉटेल सुरू झाल्यास आपण स्वतः च त्याला भेट देण्या उत्सुक असतो पण भारतात अन्यत्र इतका स्वागतशील समाज नसतो. किती तरी प्रलोभने द्यावी लागतात तेव्हा कुठे कोणी तरी येते नाही तर नावीन्याचे स्वागत तर दूरच त्याला अनुल्लेखानेच मारले जाते.
आपण सर्व सुजाण मराठी / मुंबईकर जनतेने आता कठोर आत्म-परीक्षण करून असे घाऊक पणे बळी जाणे थांबविले पाहिजे. कोपराने भुई खणून आता तर पाताळात जाण्याची पाळी आली आहे.
सबब आता तरी थांबा आणि विचार करा.