भग्न किनारे

का उदास वाटते
नयनी पाणी दाटते
असून घोळक्यातही
एकलेच वाटते

बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते

शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे

उजाड माळरान हे
गंध, गारवा नको
श्रावणातही घना
बरसणे तुझे नको

जयश्री