एकेकाळी एखाद्या कार्यालयातील, कंपनीतील वरिष्ठ लोक समाजातील होतकरू तरूण ओळखून त्यांना नोकरीस तर लावून घेतच शिवाय वेळोवेळी चांगले काम केल्याबद्दल शाबासकीही देत असत. वरिष्ठ व कनिष्ठातील वैयक्तिक संवाद खूप असे. निष्ठा असे. राजकारणाला थारा नसे.
हल्लीच्या कॉर्पोरेट दुनियेत व्यक्तिगत प्रोत्साहनाचे हे प्रमाण कमी झाले आहे का? वर्षाखेरीस पगारवाढीच्या रुपातच शाबासकीचे समाधान मानावे लागत आहे का?