गझल
माझिया डोळ्यात होती आसवे साऱ्या जगाची!
शेवटी साऱ्या नद्यांना ओढ असते सागराची!!
पावसाळी या हवेला मी तरी भुलणार नाही!
मी दिले सोडून आता वाट बघणे पावसाची!!
चार दिवसंचीच असते रोषणाई उत्सवाची!!
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?
गारव्याला माझिया होते विषारी साप सुद्धा!
जिंदगी माझी जणू होती सुगंधी चंदनाची!!
पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१