आसू
विचारतो कोण माझ्या मनातल्या भावनांना
हुंगतात सारेची फक्त माझ्या सुख-सुमनांना
वाटते पुकारावे पण विरती ते शब्द ओठी
तुच ठेवले आहे कानांवर तुझ्या हातांना
तुच सांगीतले म्हणून आहे तुला विसरायचे
शोधतो आहे उपाय थांबवू कसे श्वासांना
मला न माहीती असतात कशा वाटा फुलांच्या
चालने शिकलो तसा तुडवतो आहे काट्यांना
दिला असता निरोप जर तेव्हा ओल्या डोळ्यांनी
मानले असते मोतीच तेव्हा मी आसवांना
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.