पालकाची पाने पाण्याने धुवुन घेवून बारीक चिरणे, कांदा व मिरच्या बारीक चिरुन घेणे, त्यात चविप्रमाणे लाल तिखट, मीठ व थोडेसे हळद,हिंग घालणे. या मिश्रणामधे डाळीचे पीठ व थोडे (५-६ चमचे) तेल घालणे. पीठ जास्त नको, मिळुन येण्याइतपतच घालणे.
वरील मिश्रण कालवताना पाणी वापरायचे नाही, कारण पालकाची पाने ओली असतात, शिवाय कांदा, तिखट-मीठामुळे पाणी सुटतेच. निरलेप तव्यावर थोडे तेल घालून ह्या मिश्रणाचा छोटा गोळा घेवून पातळ थालिपीठ थापा. थालिपीठ थापताना हातावर थोडे तेल घेवून थापावे.
असे हे खरपूस व चविष्ट थालिपीठ दह्याबरोबर खाणे.
रोहिणी
नाहीत.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.