राजहंस


ही कविता नीलहंस ह्यांच्या 'बोल सखे तू बोल' या कवितेवरून सुचली.


राजहंस


तूच सूर तूच साज, तूच गीत तूच प्रीत
 जाणतो समीर धुंद, तेच गीत तीच प्रीत

 
वाजते मधूर बीन, घालते कुणास साद?
  तोच चांद तीच रात, तोच छंद तोच नाद

  धुंद फूल, धुंद पान, चांदणे कशात दंग?
नाचले खुशीत भृंग, डोलला पहा तरंग

''ये मिठीत सोड रीत'', आळवून मालकंस
      बोलवी सखीस खास, डौलदार राजहंस !!!