ऐकलेले एक बालगीत देत आहे. हे बालगीत लहान मुलांना ठेक्यात/ हावभाव करून म्हणायला आवडते.
लसूण,मिरची,कोथिंबीर,आले,
या चौघांचे भांडण झाले
कश्यावरून, कश्यावरून
एवढ्याश्या खोबऱ्याच्या तुकड्यावरून,
काकूबाई आल्या, पदर खोचून,
सगळ्यांना काढले ठेचून ठेचून
सर्वांची केली वाटणी वाटणी,
त्याची झाली सुरेख चटणी
चटणी ठेवली बशीत,
जेवण झाले खुशीत.
श्रावणी