तेलाच्या फोडणीमध्ये मिरची, आले, घालून परतावे. नंतर त्यात चिरलेला श्रावणघेवडा (बीन्स) घालून परतावे. झाकण ठेवून २-३ मिनिटांनी ते काढून परत परतावे. असे ३-४ वेळेला करावे. म्हणजे भाजी वाफेवर चांगली शिजेल. भाजी शिजण्यापुरतेच अगदी थोडे पाणी घालावे. पाणी जास्त नको, कारण ही कोरडी भाजी आहे.
नंतर त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून ३-४ वेळा परतणे. श्रावणघेवडा पटकन शिजण्याकरता खूप बारीक चिरावा.
रोहिणी
नाहीत.
विनायकच्या मित्राची आई सौ रेगे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.