एक कप मोड आलेली मटकी, अर्धा कप भिजत घातलेले सफेद व हिरवे वाटाणे
प्रत्येकी एक चमचा लसूण व आलं पेस्ट
एक लिंबू, एक चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 150 ग्रॅम गोडंतेल
प्रत्येकी एक चमचा धणा पावडर, हळद पावडर व गरम मसाला
दोन चमचे मिरची पावडर, दोन टोमॅटो व दोन कांदे
३० मिनिटे
४ जणांना
१. प्रथम मटकी, सफेद व हिरवे वाटाणे चार ते पाच तास गरम पाण्यात भिजत ठेवावेत.
२. त्यानंतर पाणी फेकून मटकी व वाटाणे रुमालात बांधून ठेवावेत. एका दिवसात मोड येतात.
३. एका पातेल्यात तेल गरम करावं. त्यात कांदा बारीक चिरून परतावा.
४. कांदा लालसर झाला की त्यात राई, जिरं, हळद पावडर, धणा पावडर, आलं व लसूण पेस्ट घालावी.
५. मसाला चांगला भाजल्यावर त्यात गरम मसाला पावडर, बारीक चिरलेले टोमॅटो व भिजवलेली मटकी व वाटाणे घालावेत.
६. दोन कप पाणी घालून मटकी व वाटाणे शिजेपर्यंत उकळावे. उसळ शिजल्यावर त्यात लिंबू पिळावं.
अशी ही गरमागरम व झणझणीत उसळ फारच रुचकर लागते. उसळ जर जास्तच तिखट वाटल्यास त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे व फरसाण घालून घालतात. त्यालाच 'मिसळ' म्हणतात
नाहीत.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.