दोस्तांनो...
आपल्या समाजामध्ये समजूतदार असण्याला किंवा विचारीपणे वागण्याला किंमत असते. एखादा समाज जेव्हा अशी एखादी प्रणाली मान्य करतो तेव्हा त्यातले फायदे तोटे मोठ्या लोकसमूहाला मान्य असतात..त्याच्यामुळे. बऱ्याचदा व्यक्तीच्या पातळीवर अशा रूढी दर वेळेला योग्य असतातच असे नाही. प्रत्येक माणसाला अनंत इच्छा असतात. अगदी पांचट वाटतील अशा गोष्टी करून बघण्याची इच्छा असते. जसं की खूप लोकांना हिंदी फिल्मी डान्सच्या क्लासला जायचं असतं, सलग २ वर्षे बॉडी बिल्डिंग करायचं असतं, स्वतःचा बिझिनेस स्टार्ट करायचा असतो, आपल्या आवडत्या हिरो ला किंवा हिरॉईन ला जाऊन भेटायचं असतं, बायकोला किंवा नवऱ्याला घरी ठेवून बाहेर वेळेचा वगैरे काही विधिनिषेध न ठेवता भटकायचं असतं, एखाद्या गोष्टीने प्रचंड आनंद झाला तर मनापासून ओरडायचं असतं आणि अशा अनेक गोष्टी. लक्षात घ्या ह्या गोष्टी अगोचर किंवा टवाळक्या नाहीयेत. ह्या अगदीच साध्या गोष्टी आहेत ह्या खरंच मनात आणलं आणि काहीही ऐकायची तयारी ठेवली तर खरंच करता येऊ सुद्धा शकतात. ह्या छोट्या पण आयुष्य जगत असताना आपण सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहोत याची जाणीव करून देणाऱ्या साघ्या साध्या घटना आहेत. पण बरीचशी माणसं असं म्हणू सुमारे ७० ते ८० % माणसं असं करत नाहीत. याचं कारण आपली सवय. आपली ठरलेल्या मार्गाच्या बाहेर न जाण्याचा शिरस्ता. ह्या मध्ये सोय बघितलेली असते. एका मोठ्या समूहाने घालून दिलेले नॉर्म्स तोडतानाच आपला इतका जीव निघून जाऊ शकतो की फार रस राहतं नाही अशा गोष्टी करण्यामध्ये. आणि मग जेव्हा एखादा मनुष्य समाजाचा भाग बनू पाहतो..तेव्हा त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा ठेवलेली असते. खरं पाहता कुठलीही व्यक्ती इतकी बहुविध कंगोऱ्यांची असते की सहज पणे त्या आकाराला समाजाच्या मोठ्या कोलाजावर जागाच नसते. ह्या मोठ्या समूहाचा भाग बनण्याची किंमत प्रत्येक माणूस आपली विशेषता गमावूनच बनू शकतो. पण दुर्दैवाने या प्रक्रियेला समज येणे असं म्हणतात. ह्याला समाजाचा हट्ट म्हणायचं की की व्यवस्थेची मजबूरी माहीत नाही. पण मला हे जाणवतं...
मला तुमच्या कल्पना ऐकायला आवडतील....