२० वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊन युती तुटायची वेळ आली आहे कारण प्रतिभाताई पाटील यांना सेनेने दिलेला पाठींबा(अजुनही काही कारणे असु शकतात).केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत युती झाली. काही दिवसापुर्वीच शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बाळासाहेबांनी सांगितले की पुढील निवडणुक स्वबळावर(कोणाशिही युती न करता) जिंकायची त्यासाठी त्यांनी उ.प्रदेशच्या मायावतींचा दाखला दिला. मुळात शिवसेनेची स्थापना झाली मराठीच्या मुधावर. १९८९ नंतर शिवसेनेने हिंदुत्व घेतले.आणि सेना हिंदुत्ववादी झाली. त्यामुळे सेनेची नेमकी भुमिका काय ते कळत नाही.
जर येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या झाल्यास(मायावतींप्रमाणे) शिवसेनेला हिंदुत्व सोडून धावे लागेल. केवळ मराठीच्या मुधावर सेना पुढील निवडणुका जिंकु शकते का? आपणास काय वाटते.
माझे मत युती तुटायला हवी.
आपला
कॉ.विकि