जे मनाला पाहिजे ते...

जे मनाला पाहिजे ते मिळत नाही
जे नकोसे वाटते ते टळत नाही...

एवढा माझ्यामध्ये मी गुंग असतो;
सूर आताशा कुणाशी जुळत नाही...

चेहरा इतका निरागस, भाबडा पण
आतले काही कुणाला कळत नाही...

अश्रु प्याले, मद्य आणिक जहरसुद्धा
दुःख माझे त्यांतही विरघळत नाही...

चांदणेही लुप्त असते रात्रभर अन
रात्र वैऱ्याची अशी मग ढळत नाही...

वाट ही नुसतीच जाते दूर कोठे?
वळण येते तरिहि मागे वळत नाही...

स्वप्न, आशा, ध्येयही दिसते पुढे पण
आज मागे मी कशाच्या पळत नाही...